कर्नाळा किल्ला कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो.छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला होता आणि नंतर तो पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि परत इ.स. १६७० साली मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यामध्ये आणला. किल्लाच्या अंगठा सारख्या आकारामुळे हा किल्ला बाकीच्या किल्ल्यापासून वेगळा वाटतो.किल्ल्याचा माथा हा फारच लहान आहे.पक्षी अभयारण्यामुळे हा किल्ला खुपच प्रसिद्ध आहे.पण किल्ल्याच्या तटबंदी ह्या ढासळलेल्या अवस्थेत आहे. कर्नाळा गडावर भवानी मातेचे मंदिर आहे आणि भवानी मंदिराच्या जवळच एक वाद आहे आणि सध्या तो ढासळलेल्या अवस्थेत आहे. गडावरील अंगठ्याच्या आकारातील सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची एक टाकी आणि धान्य कोठारेच साठे आहेत.सुळका चढण्यासाठी अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय चढण्याचा प्रयत्न करू नये. गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था. «» राहण्यासाठी खोल्या : किल्ल्याच्या पायथाल्या असलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये रहाण्याची सोय उपलब्ध