कर्नाळा किल्ला
कर्नाळा हा किल्ला प्राचीन
कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो.छत्रपती शिवरायांनी
इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला होता आणि नंतर तो पुरंदरच्या
तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि परत इ.स. १६७० साली मराठ्यांनी हा
किल्ला परत स्वराज्यामध्ये आणला.
किल्लाच्या अंगठा सारख्या आकारामुळे हा किल्ला बाकीच्या किल्ल्यापासून वेगळा वाटतो.किल्ल्याचा माथा हा फारच लहान आहे.पक्षी अभयारण्यामुळे हा किल्ला खुपच प्रसिद्ध आहे.पण किल्ल्याच्या तटबंदी ह्या ढासळलेल्या अवस्थेत आहे. कर्नाळा गडावर भवानी मातेचे मंदिर आहे आणि भवानी मंदिराच्या जवळच एक वाद आहे आणि सध्या तो ढासळलेल्या अवस्थेत आहे. गडावरील अंगठ्याच्या आकारातील सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची एक टाकी आणि धान्य कोठारेच साठे आहेत.सुळका चढण्यासाठी अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय चढण्याचा प्रयत्न करू नये.
गडावर जाण्या-येण्याची तसेच
राहण्या-खाण्याची व्यवस्था.
«» राहण्यासाठी खोल्या :
किल्ल्याच्या पायथाल्या असलेल्या
शासकीय विश्रामगृहामध्ये रहाण्याची सोय उपलब्ध आहे.
«» कसे जावे :
मुंबई-गोवा महामार्गाने जाताना पनवेल
नंतर शिरढोण गाव लागते. गावाच्या जवळच कर्नाळा किल्ल्याचा परिसर आहे.
«» जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
किल्ल्याचा माथा फारच तहान आहे.
किल्ल्याचे प्रवेशव्दार ढासळलेल्या अवस्थेत आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर
भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एक वाडा संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे.
समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य
साठवण्याची जागा आहेत. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे हे
अत्यंत आवश्यक आहे. सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणारे साहित्य सुद्धा हवे. या
व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी
अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येता येईल. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे
पुरतात.
या किल्ल्याची उंची आहे सुमारे ४५०
मीटर असल्यामुळे हा गडावर चढणे फारसे अवघड काम नाही . किल्ल्याच्या पश् चिमेकडून
जाणाऱ्या वाटेने थोडे चढल्यावर एक खडक लागतो. खडक चढून गेल्यावर एक दरवाजा लागतो.
आत शिरल्यावर इमारतीच्या पडत आलेल्या भिंती व त्यांचा सुळका दिसुन येतो. या
सुळक्यात १२-१३ व्या
शतकामध्ये खोदलेली चार दान्य कोठारे तसेच पाण्याच्या टाक्या आहेत.
या ठिकाणी पारसी व मराठी शिलालेखही
आढळतात यातल्या एका पारसी शिलालेखात 'सय्यद नुरुद्दीन मुहम्मदखान, हिजरी ११४७ असे लिहिले
आहे तर मराठी शिला लेखात 'शके १५९२ संवस्तर आषाढ शु.१४
कर्नाळा घेतला' असे लिहिले आहे.
माथ्यावर असलेला ५० मिटर उंचीचा सुळका
प्रथम दर्शनीच छातीमध्ये धडकी भरवितो. परंतू हा सुळका गिर्यारोहकांचा लाडका आहे.
पश् चिमेच कलत्या असलेल्या या सुळक्यावर मधमाशांचे पोळे आहेत आणि या पोळ्यातल्या
मधासाठी परिसरातील ठाकरांनी काही पायऱ्या खोदल्या आहेत परंतू सामान्य पर्यटकाला
त्यावर चढता येणे कठीण आहे. या किल्ल्यावरुन पश् चिमेकडे मुंबई, घारापुरी बेट, माणिकगड,
सह्याद्री रांगेत नागफणी, राजमाची व माथेरान
दिसून येते.
गडावर पुर्वी देवगिरीचे यादव राज्य
करित असत. सन १५४० मध्ये हा किल्ला अहमदनगरच्या ताब्यात गेला होता ,नंतर गुजरातच्या सुलतानने पोर्तुगिजांची मदत घेऊन हा किल्ला ताब्यात घेतला आणि कालांतराने
शिवाजी महाराजांनी किल्ला त्यांच्या राज्यात आणला.
कर्नाळा किल्ला परिसरात दाट जंगल असून
येथे विविध प्रकारचे पक्षी दिसून येतात म्हणुन शासनाने येथे २ ऑक्टोबर १९६९ साली
४.५० चौ.कि.मी.क्षेत्रात पक्षी अभयारण्याची निर्मिती केली . या अभयारण्यात १५०
जातींचे विविध पक्षी आढळतात.आणि ४० जातिंचे विविध पक्षी स्थालांतर करुन विविध
हंगामात इकडे येतात. निरिक्षण केल्यास आपल्याआ खंड्या, ससाणा, हिरवा
तांबट, मोर,पंचरंगी पोपट, कालशिर्ष कांचन, हिरवा तांबट इत्यादी तसेच इतर अनेक
दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडू शकते. येथे पक्षांसाठी ११
पक्षीघरे असून स्थानिक नसलेले दुर्मिळ पक्षी या ठिकाणि पहावयास मिळतात.
पक्षीनिरिक्षणाचा छंद सध्या बराच
लोकप्रिय होत चालला आहे. गळ्यात दुर्बिण अडकावून दाट जंगलात पक्ष्यांचा मागोवा घेत
भटकणे, दिसलेल्या सुंदर
पक्ष्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात बंदिस्त करणे, दुरवर असलेल्या
गोड पक्ष्याच्या गोड गाण्यात आपत्रिही एखादी तान मिसळवणे, परिसरात
पडलेली पक्ष्यांची रंगिबेरंगी पिसे जमवणे यातली मजा काही औरच आहे. म्हणतात ना 'हा छंद जिवाला लावी पिसे!' परंतु हे सर्व त्या
बिचाऱ्यांना त्रास न देताच करा.
खालील दिलेल्या महाराष्ट्रातील किल्ले यांनाही अवश्य भेट द्या आणि आपल्या किल्ल्या बद्दल अजून माहिती जाणून घ्या
गवळीगड(गाविलगड) किल्ला (अमरावती)
बहादुरगड (धर्मवीरगड) अहमदनगरचा
देवगिरी-दौलताबाद किल्ला (औरंगाबाद )